असं म्हणत आपण २०२४ चा टप्पा पूर्ण करीत २०२५ च्या युगपर्वात पदार्पण केलं.
लहापणापासूनच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा नाजूक असा कोपरा
इथे प्रश्न फक्त त्यांनी केवळ अंगावर झेललेल्या शेणा मातीचा नव्हे तर हा खूप नाजूक विषय आहेच म्हणा, दगड धोंडे अगदी रक्तपात होईपर्यंत ओले घाव सोसून क्रांती केली तेव्हा आज तुम्हा आम्हा शिक्षणाचा पाया मजबूत झाला. लिहिता वाचता येऊ लागलं तेव्हा कोण कुठले धूर्त इंग्रज, ब्रिटिश , सरकार, याचे पडसाद उमटले
मुलींना शिक्षणासोबत स्व संरक्षण काय असत याचीही परिभाषा ज्ञात झाली. स्वैराचार पाठीशी टाकून लढून शिक्षण आणि संरक्षण सार्थकी लावली.
जागे व्हा, उठा आणि शिक्षित व्हा, परंपरा मोडून काढा आणि मुक्त व्हा अशा जुजबी ओळख निर्माण करणाऱ्या युगस्त्री म्हणजेच क्रांतीकारी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना स्मरून सांगायचं झालं तर आजही त्यांचे अस्तित्व आणि त्यांची तत्त्व आचरणात आणली जातात. यापुढेही पुढील नवतरूणांच्या नवपर्वात ते कायम राखले जाईल.
शिक्षण हे केवळ दर्जा, पात्रता, बुद्धिमत्ता किंवा भेदभाव या जोरावर महत्त्वपूर्ण होत नाही तर ते अधिकतम जिद्द, चिकाटीच्या बळावर प्राबल्यित होत असत ही शिकवण ज्योतिबा फुले आणि शिक्षिका सावित्रीबाई फुले यान देऊन, घडवून आणि शिकवून शिक्षण सार्थकी ठरविले.
पुन्हा एकदा शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन......!
No comments:
Post a Comment